“शेतक-यांनो तुमची मानसिकता बदला, हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत !”

“शेतक-यांनो तुमची मानसिकता बदला, हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत !”

जालना – शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला. त्यासाठी लागणारी कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार आहोत असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घनसावंगीच्या जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले आहे.

लोकशाहीमध्ये कुणाला निवडून द्यायचे हा अधिकार जनतेचा असतो. परंतु लोकशाहीमध्ये ज्यांना तुम्ही निवडून दिले त्यांनी आज काय अवस्था केली आहे. सरकार नुसत्या घोषणा करत आहे. कृती तर काहीच करत नाही असा आरोप करतानाच केंद्रात, राज्यात ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना द्यायला पैसे का नाहीत असा सवालही अजित पवार यांनी सरकारला केला आहे.माझ्या शेतकऱ्याला, कामगाराला आणि सुशिक्षित वर्गालाही हे सरकार फसवत आहे. तुमचे आमचे खिसे कापण्याचा आणि लुटण्याचा प्रकार हे सरकार करत असून शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन अजितदादांनी त्यावेळी केले आहे.

तसेच या सभेमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर जोरदार टीका करत राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेमुळे सरकार हादरलं असल्याचं म्हटलं आहे. या सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी त्यावेळी जनतेला  केलं आहे.

COMMENTS