एकनाथ खडसेंच्या पारा चढला अन् अखेर सरकार नमले !

एकनाथ खडसेंच्या पारा चढला अन् अखेर सरकार नमले !

मुंबई – खान्देशातील महत्त्वाचे मंजुर प्रकल्प कोणतेही कारण न देता रद्द केले जात असल्याबद्दल ज्येष्ठ भाजप नेते यांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला. हा जळगावला विरोध आहे, खान्देशला आहे की एकनाथ खडसेंना ? असा सवाल केला. यासाठी पडद्यामागे कोण राजकारण करत आहे याचा आपण शोध घेत आहे पण मंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यावं अशी  मागणी खडसे यांनी केली. त्यावर खडसे यांनी मांडलेल्या मुद्यांची उत्तरं पटलावर ठेवण्याची तयारी मंत्र्यांनी दर्शवली. मात्र संतापलेल्या खडसेंनी यावर आपल्याला आत्ताच उत्तर हवी आहे अशी मागणी केली. त्यामुळे सरककार काहीसे बॅकफूटवर आले. शेवटी खान्देशातील कोणतेही प्रकल्प रद्द होणार नाहीत असं आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना द्यावं लागलं. तेंव्हाच खडेसंचा पारा कमी झाला.

COMMENTS