आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल !

आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल !

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावरुन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.  कुलपतींनी दिलेली 31 जुलैची मुदत संपली तरी सर्व निकाल लागले नाहीत. हा कुलपतींचा अवमान आहे. तसंच सरकारनं विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केल्याची घणाघाती टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. असा भोंगळ कारभार कधीही, कोणीही आधी पाहिला नव्हता. या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. निकालतर वेळेवर लागला नाहीच. आता पुढे मार्कशीट कधी मिळणार ? गोंधळाला जबाबदार कोण  ? टेंडर कोणाला दिले ? कसे दिले? घोटाळा आहे का? हे सर्व प्रश्न उपस्थित होतात असंही आदित्य ठाकरे म्हणाले. विद्यार्थ्यांची रिव्हॅल्युएशन फी माफ करा अशी मागणीही त्यांनी केलीय तसंच PG आणि  परदेशात  शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क सुरु करण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

COMMENTS