उद्धव ठाकरेंनी दिले वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत!

उद्धव ठाकरेंनी दिले वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत!

मुंबई – त्यांचे पर्याय खुले हाेवू द्या मग आमचे खुले करताे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत.मी सेनाप्रमुखांना दिलेले वचन पाळणारच आहे. मी मुख्यमंत्री शिवसेनेचा करणारच आहे.राज्यानं ठरवावं की खरे बाेलणारे हवीत की खाेटे बाेलणारे हवीत. खाेटे बाेलणं आमच्या रक्तात नाही.काँग्रेस – राष्ट्रवादीसाेबत चर्चा सुरू केलेली नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान टीकेची पर्वा न करता जनतेची बाजू मांडत आलाे आहे. दु:ख झाले की या परिवारावर म्हणजे माझ्यावर खाेटारड्यापणाचा आराेप केला. देवेंद्रनी अमित शहांचा आधार घेवून खाेटेपणाचा आराेप केलाय. पद व जबादारीचे समसमान वाटपात मुख्यमंत्रीपद येतं की नाही?, गाेड बाेलून मिठी अडवली. सत्तेची खुर्ची वेडी करते
देवेंद्र मित्र हाेते, म्हणून पाच वर्षे पाठिंबा दिला हाेता असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच उपमुख्यमंत्री देवू केले हाेते पण मी लाचार नसल्याचे सांगितले. बाळासाहेबांना वचन दिल्याप्रमाणे सीएम हवं असल्याचे सांगितले.
अमित शहांना समसमान पदवाटपाचे सांगितले, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी मान्य केले मग ते माताेश्रीवर आले. देवेंद्रजींना हे सांगितले गेले. पण नंतर त्यांनी शब्दांचा खेळ केला.

वेळ मारण्यासाठी खाेटे बाेलणार नाही, मी काही भाजपवाला नाही. पहिली टर्म व दुसरी टर्म, खातेवाटपाबाबत चर्चा केली असती. नितीशकुमारांनी वेगळी चूल मांडली, मी नाही मांडली. भाजपला शत्रू मानत नाही, पण त्यांनी खाेटे बाेलू नये. खाेटं काेण बाेलतंय ते बघा. आम्ही माेदींवर टीका केली नाही. उदयनराजेंनी पूर्वी टीका केली हाेती. माेदी मला भाऊ मानतात पण भावाभावाच्या नात्यात काेण अडथळा आणतंय याचा शाेध माेदींनी घ्यावा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच आरएसएसने विचार करावा की, खाेटे बाेलणं कुठल्या हिंदुत्वात बसतं. बहुमत नसताना सरकार येणार म्हणणारे काळजीवाहू मुख्यमंत्री कसे म्हणतात. मग मी इतर पर्यायाचा विचार आम्ही केला तर काय वाईट?, तुमच्याकडूनच आम्ही या गाेष्टी शिकलाेय. मला खाेटे ठरवलेल्या माणसाशी बाेललाे नाही. शब्द फिरवणारी वृत्ती आमची नाही. राज्याच्या जनतेला उल्लू बनवण्याचे काम त्यांनी थांबवावे. दाेन हिंदुत्व मानणाऱ्या शक्ती एकत्र आल्या हाेत्या याचे समाधान हाेते. गंगा साफ करताना यांची मने कलुषित झाली. चुकीच्या माणसांसाेबत कारण नसताना गेलाे याचे दु:ख असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कर्जमाफी अजून शेतकऱ्यांपर्यंत पाेहचलेली नाही. तुम्ही आमच्यावर पाळत ठेवू नका. माेदी व माझे भावाभावाचे नाते कुणाला खुपतंय त्यांनी सरकार स्थापनेचा दावा करावा. राज्याच्या जनतेला आम्ही वाऱ्यावर साेडणार नाही. युती त्यांच्यावर अवलंबून आहे. जेवढा विश्वास ठाकरे कुटुंबियांवर तेवढाच अविश्वास शहा कंपनीवर आहे. खाेटेपणाचा आराेप केल्यानं चर्चा बंद केली. तुमच्या शब्दावर आता विश्वास नाही. राम मंदिराचे श्रेय सरकारचे नाहीय, ताे न्याय म्हणून स्विकारावा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

COMMENTS