‘या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे’, उद्धव ठाकरेंवर निशाणा !

‘या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे’, उद्धव ठाकरेंवर निशाणा !

नवी दिल्ली – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 25 तारखेला अयोध्येचा दौरा करणार आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी टोला लगावला आहे. ‘या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे असल्याचं मगंत गिरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विश्व हिंदू परिषदेतर्फेही २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत रॅलीचे आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र गिरी यांनी ही शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला आहे. जर हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षांचा मंदिर निर्माण करणे हा  हेतू असता तर त्यांनी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले असते का? असा सवाल महंत गिरी यांनी केला आहे.

तसेच या दोन्ही संघटनांच्या कार्यक्रमातून मंदिर बांधण्यासंदर्भात तोडगा निघणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच आखाड्याशी संबंधित साधू- संत शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS