अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती !

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती !

मुंबई – अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी देता येईल. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी लिहून द्यावे, त्यांची परीक्षा घेतली जाईल. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा घेता येतील. तसेच या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या, इंजिनिरिंग, फार्मसी, आदी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने, राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला आहे. एटीकेटीचा अजून निर्णय घेतला नाही. मात्र सरकारने त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग शिल्लक आहे, त्यावर कुलगुरु निर्णय घेतील. त्यांची एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS