इराकमध्ये बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांची हत्या – सुषमा स्वराज

इराकमध्ये बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांची हत्या – सुषमा स्वराज

नवी दिल्ली – इराकमध्ये बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांची हत्या करण्याती आली असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. राज्यसभेमध्ये बोलत असताना स्वराज यांनी ही माहिती दिली आहे. हे सर्व भारतीय नागरिक इराकमधील मोसुलमध्ये बेपत्ता झाले होते. ३९ पैंकी ३८ मृतदेहांचे डीएनए सॅम्पल मॅच झाले असून दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं या सर्वांची हत्या करून त्यांचं दफन केलं होतं. या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए सॅम्पल पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर ही माहिती समोर आली असल्याचं स्वराज यांनी म्हटलं आहे..

दरम्यान हत्या करण्यात आलेल्या सर्व भारतीयांचे मृतदेह अमृतसर एअरपोर्टला आणले जाणार असून मृतांमध्ये ३१ पंजाबचे, ४ हिमाचल आणि उरलेले इतर पश्चिम बंगाल-बिहारचे असल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली आहे. तसेच हे मृतदेह आणण्यासाठी स्वत: जनरल व्ही के सिंह इराकला जाणार असल्याचंही स्वराज यांनी म्हटलं आहे. स्वराज यांनी दिलेल्या या दुःख माहितीमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

COMMENTS