“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळे सरसकट कर्जमाफी मिळाली नाही”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळे सरसकट कर्जमाफी मिळाली नाही”

सांगली – कर्जमाफीच्या मुद्यावरुन राज्यभर राजकारण पेटलं असताना, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. कर्जमाफी करताना मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी पवार आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांनी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देऊ नये असा सल्ला दिल्याचा खळबळजनक दावा सुभाष देशमुख यांनी केला आहे. आता हे पवार आणि ठाकरे सुभाष देशमुख यांच्यावक्तव्यावर काय उत्तर देतात ते पहावं लागेल.

यावेळी बोलताना सुभाष देशमुख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रादी  काँग्रेसचा समाचारही घेतला. ज्यांनी सहकार बुडवला तेच आज आमच्यावर टीका करत आहेत असा टोलाही देशमुख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे. सरसकट कर्जमाफीच्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

COMMENTS