समोर कोणीही असो, निवडणूक मीच जिंकणार – श्रीरंग बारणे

समोर कोणीही असो, निवडणूक मीच जिंकणार – श्रीरंग बारणे

पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघात 2019ला खासदार मीच असणार असल्याचा आत्मविश्वास शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे. मावळमध्ये जनमानसात मी पोचलेलो आहे, त्यामुळे समोर कोण उभं राहतेय याची मला फिकीर नाही असं बारणे यांनी म्हटलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी आज ‘मातोश्री’वर बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या श्रीरंग बारणे यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

दरम्यान दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करून तयारीचा आढावा घेतला. ‘मातोश्री’वर शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात यंदा दसरा मेळावा होत असल्यानं स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच या मेळाव्यात उद्धव ठाकरे आपल्या अयोध्यावारीची तारीखही घोषित करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS