शरद पवारांची भाजपवर जोरदार टीका, “महाराष्ट्रातलं सरकार जर सर्कस असेल तर त्यांना…”

शरद पवारांची भाजपवर जोरदार टीका, “महाराष्ट्रातलं सरकार जर सर्कस असेल तर त्यांना…”

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातलं सरकार जर सर्कस असेल तर त्यांना आता एका विदुषकाची गरज आहे असा सणसणीत टोला पवारांनी लगावला आहे. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं ही एक सर्कस असल्याची टीका भाजप नेते राजनाथसिंग यांनी केली होती.त्या टीकेल पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

10 जून हा राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आहे. या 22व्या स्थापनादिना निमित्त पवारांनी फेसबुक लाईव्ह करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्ष दोन दशकं वेगवेगळ्या टप्प्यातून गेला आहे. सत्ता नसताना आणि सत्ता असताना पक्ष कधीही संपलेला नाही. तो कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे असे पवारांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान काहींनी पक्ष संपेल अशी भाकितं वर्तवली होती पण तसं झालं नाही कार्यकर्त्यांच्या जोरावर आजही पक्ष उभा आहे. सत्ता असताना आणि सत्ता नसतानाही पक्ष जिवंत ठेवलाय त्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो असं पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS