“पायल रोहितगी’ला तात्काळ अटक करा, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”

“पायल रोहितगी’ला तात्काळ अटक करा, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”

पुणे – पायल रोहितगी’ला तात्काळ अटक करा, अन्यथा महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. ६ जुन १६७४ ला शिवरायांचा ‘राज्याभिषेक’ झाला. शेतकऱ्यांचे कैवारी देशाचे पहिले छत्रपती झाले. हिच ‘सल’ तुमच्या सारख्याच्या कपटी मनात असल्याने तुम्हाला त्यांचे कर्तुत्व दिसत नाही. ‘खोटी पुस्तकं खोटा इतिहास शिकवतात.’ तर शुद्रत्व आठवते. पायल… तुझी जिभ छाटली पाहिजे गं. तुमच्या सारख्या नालायक लोकांमुळे देश बदनाम आहे. आमच्या महिला ब्रिगेड तुला ठोकल्याशिवाय सोडणार नाही. पायल तुझ्या राहणीमाणातून तुझी लायकी कळतेच. पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करून ‘पायल’ हिला तात्काळ अटक करा.अन्यथा महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.

दरम्यान पायलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शन देताना ‘शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला होता’ तिने म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. तिने ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरही ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर संभाजी ब्रिगेडनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.

COMMENTS