उद्धव ठाकरेंची ‘ती’ सवय तशी जुनीच आहे – राजू शेट्टी

उद्धव ठाकरेंची ‘ती’ सवय तशी जुनीच आहे – राजू शेट्टी

मुंबई -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने उद्धव ठाकरेंना आता शेतकऱ्यांची आठवण झाली आहे. ही त्यांची सवय तशी जुनीच असल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुटलं. हे गेली तीन वर्ष सुरू असताना तुम्हाला आता साक्षात्कार कसा झाला?, असा सवालही राजू शेट्टींंनी केला आहे.

दरम्यान गेल्या पाच वर्षात राज्यातील कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळाला नाही. या प्रश्नांवर तुम्ही कधीच कडक शब्दात बोललेले दिसले नाहीत. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शेतकय्रांचा पुळका येत असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS