राज ठाकरेंचे व्यंगचित्राद्वारे मोदींवर फटकारे !

राज ठाकरेंचे व्यंगचित्राद्वारे मोदींवर फटकारे !

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या संसदेतील भाषणावर आपल्या कुंचल्याद्वारे निशाणा साधला आहे. मोदींना राजकारणासाठी काँग्रेसच्याच माजी नेत्यांची गरज का पडते असा सवाल राज यांनी या व्यंगचित्रातून केला आहे. मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा नेहरू-पटेल वाद उकरून काढत, सरदार पटेलांवर काँग्रेसने पंतप्रधानपदी न बसवून अन्याय केल्याचा गंभीर आरोप केला होता. राज ठाकरेंनी हाच मुद्दा पकडून मोदींना फटकारे मारले आहेत.

राज यांच्या नव्या व्यंगचित्रामध्ये महात्मा गांधी पंतप्रधान मोदींना समजावताना म्हणतात, ”अरे बेटा नरेंद्र, तुला जरा दोन गोष्टी सांगायच्या आहेत! जवाहरलालना पंतप्रधान मी केले! काँग्रेसने नाही. यावर काही बोलायचंय? आणि दुसरं म्हणजे वल्लभभाई जरी देशाचे गृहमंत्री होते, तरी ते काँग्रेसचेच नेते होते ना? मग तुला त्यांचा पुतळा का उभारावासा वाटला! पण, तू जिथून आलास, त्या हेडगेवारांचा किंवा गोळवलकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला? प्रचारक होतास ना तू? असे थेट प्रश्न राज यांनी या व्यंगचित्रातून रेखाटले आहेत.

 

COMMENTS