‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांना जागं केलं, आता पंतप्रधान मोदींना जागं करणं बाकी आहे – राहुल गांधी

‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांना जागं केलं, आता पंतप्रधान मोदींना जागं करणं बाकी आहे – राहुल गांधी

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुजरात आणि आसाममधील मुख्यमंत्र्यांना गाढ झोपेतून उठवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. मात्र, पंतप्रधान अजूनही झोपलेले आहेत. आम्ही त्यांनाही जागे करु, असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर भाजपाशासित राज्य असलेल्या गुजरातने ६.२२ लाख थकीत वीज बिल आणि आसाममध्ये ८ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच आम्ही दिलेलं आश्वासन पाळलं आहे. शेतकऱ्यांचे ४१ हजार १०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे सत्तेवर येताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे आश्वासन दिले होते. त्यानंतर भाजपला जाग आली असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS