राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तनाची लाट आता पश्चिम महाराष्ट्रात !

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तनाची लाट आता पश्चिम महाराष्ट्रात !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केंद्र आणि राज्य सरकारविरोधात परिवर्तन यात्रा काढली आहे. या यात्रेचा पुढील टप्पा आता पश्चिम महाराष्ट्राकडे कूच करणार आहे. २८ जानेवारी रोजी कागल, मुदाळ, कोल्हापूर शहर व शिरोळ, २९ जानेवारी रोजी कराड, रहिमतपूर व फलटण आणि ३० जानेवारी रोजी पंढरपूर व अकलूज येथे परिवर्तन सभा होणार आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं ही यात्रा काढली असून या यात्रेद्वारे राज्यातील आणि देशातील विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका करण्यात येत आहे. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून याकडे सरकारनं साफ दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केला आहे. तसेच सरकारच्या अनेक योजना या फसव्या असल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

COMMENTS