नवी मुंबईचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या – अबू आझमी

नवी मुंबईचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या – अबू आझमी

मुंबई – समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नवी मुंबईचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. तसेच ठाणे शहराला जिजामातांचे नाव द्यावे आणि पुण्याला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणीही आझमी यांनी केली आहे. विधानसभेमध्ये बोलत असताना त्यांनी ही मागणी केली आहे.

‘स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे नाव ठाणे शहराला देऊन ठाणे शहराचे नाव बदलून ते ‘जिजामाता नगर’ असे करण्यात यावे. तसेच, शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवणारे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुणे शहराचे नामकरण करुन पुण्याला छत्रपती संभाजी नगर नाव द्यावे अशी मागणीही अबू आझमी यांनी केली आहे. त्यामुळे अबू आझमी यांच्या मागणीबाबत सरकार काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS