नगरच्या जागेवरुन पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष, जयंत पाटलांचा खुलासा!

नगरच्या जागेवरुन पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष, जयंत पाटलांचा खुलासा!

मुंबई – नगरच्या जागेवरुन पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष सुरु झाला असल्याचं दिसत आहे. कारण ही जागा काँग्रेसला सोडली असल्याचं वक्तव्य कालच ळयशरद पवार यांनी केलं होतं परंतु त्यानंतर अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली असल्याची तथ्यहीन वृत्त प्रसिद्ध करण्यात येत आहेत असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे नगरच्या जागेवरुन पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरु झाला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सुजय हा तुमच्या नातवासारखा आहे. त्याच्यासाठी लोकसभेची जागा सोडा, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना केले होते. त्यानंतर काल पवार यांनी अकलूज येथे नगरची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घोषित केला. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जागा सोडली नसल्याचा खुलासा केला. त्यामुळे या जागेवरुन पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष सुरु झाला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS