आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाचा राजकीय पक्षांना महत्वपूर्ण आदेश !

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाचा राजकीय पक्षांना महत्वपूर्ण आदेश !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने राजकीय पक्षांना महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.  प्रत्यक्ष मतदानाआधी ४८ तासांत सोशल मीडियावरुन कोणतीही राजकीय जाहीरात प्रसिद्ध होता कामा नये असा आदेश कोर्टानं दिला आहे.यासंदर्भात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. तसेच याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला तशा सूचना द्याव्यात असा आदेशही कोर्टानं दिला आहे.

दरम्यान लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अनुसार १२६ कलमांतर्गत ही जनहीत याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी पुढील सुनावणी पुढील गुरुवारी होणार आहे. १२६ या कलमानुसार, मतदानापूर्वी ४८ तास हा ब्लॅक आऊट पिरिअड असतो. या काळात राजकीय नेत्यांना कोणतीही जनसभा, निवडणूक प्रचार तसेच निवडणुकीसंदर्भातील कोणतेही प्रदर्शन करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

त्यामुळे या कलमाचा आधार घेत आता फेसबुक, ट्टिवटर आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अशा प्रकारचा कोणताही मजकूर प्रसिद्ध होता कामा नये, असे याचिकेत म्हटले आहे. यावरुन आता कोर्टाने निवडणूक आयोगाला कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला तशा सूचना द्याव्यात असा आदेशही कोर्टानं दिला आहे.

COMMENTS