मागण्यांचे काय झाले ? मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आज सरकारला विचारणार जाब !

मागण्यांचे काय झाले ? मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आज सरकारला विचारणार जाब !

मुंबई – मराठा समाजाच्या मागण्यांचं काय झालं ? याचा जाब विचारण्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना  भेटणार आहेत. दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक होणार आहे. गेल्या 9 तारखेला मराठा समन्वय समितीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांना औरंगाबादमध्ये याविषयी विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी 14 तारखेला मुंबईत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार आजची बैठक होत आहे. यासंदर्भात योग्य तोडगा निघाला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असा इशाराही समन्वय समितीच्या सदस्यांनी दिला आहे.

COMMENTS