राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना रणनिती बनवून कॉंग्रेसला नुकसान पोहचवतात

राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना रणनिती बनवून कॉंग्रेसला नुकसान पोहचवतात

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय. यामध्ये कॉंग्रेस पार्टी ही केवळ सहयोगी पक्ष म्हणून काम करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हेच सरकार चालवण्याच्या भूमिकेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस कट करून कॉंग्रेसचे महत्व कमी करत आहे. शिवसेना आणि एनसीपी कॉंग्रेसची वोट बॅंक आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

माजी खासदार संजय निरुपम यांचे समर्थक व मुंबई कॉंग्रेस कमेटीचे महासचिव विश्वबंधु राय यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल तक्रार केलीय. त्यामुळे महाविकास आघाडीत सार काही अलबेल नसल्याची चर्चा आहे.

पत्रात म्हटले आहे की, आमचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना हा जाणिवपूर्वक, रणनिती बनवून कॉंग्रेसला नुकसान पोहोचवत आहे. ते दोन्ही आपल्या पक्षाला पुढे नेण्याच्या मागे लागले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्या गेलेल्या आश्वासनांवर काम होत नाहीत. पार्टीमधील पदाधिकाऱ्यांच्या गळतीवर ठोस पावलं उचलायला हवीत.

COMMENTS