लोकसभा निवडणुका एकाच मुद्यावर लढल्या जातील, तो म्हणजे ‘नरेंद्र मोदी’ – जयराम रमेश

लोकसभा निवडणुका एकाच मुद्यावर लढल्या जातील, तो म्हणजे ‘नरेंद्र मोदी’ – जयराम रमेश

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुका या या एकाच मुद्द्यावर लढवल्या जाणार असून तो म्हणजे नरेंद्र मोदी हाच असणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलं आहे. 2014 मध्ये एकमेव मुद्दा होता तो म्हणजे काँग्रेस तर पुढील निवडणुकीतला मुद्दा फक्त नरेंद्र मोदीच असणार असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. मोदींनी केलेला खोटेपणा उघड करण्याचं काम आम्हाला करायचं असून राहूल गांधी अध्यक्ष झाल्यावर काँग्रेसमध्ये तरूणांना मोठ्या प्रमाणावर वाव मिळाला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गोवा मणीपूरमध्ये काँग्रेस तोंडावर पडली होती व मधल्यामध्ये बहुमत नसूनही भाजपानं मोका साधला होता. मात्र कर्नाटकमध्ये काँग्रेस गाफील राहिली नाही आणि तिनं अचूक खेळी करत सत्ता स्थापन केल्याचा दाखला यावेळी जयराम रमेश यांनी दिला आहे. लहान पक्ष असूनही जनता दल सेक्युलरला मुख्यमंत्रीपद देत मोठं मन काँग्रेसने दाखवलं असून भाजपाविरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करण्याचं धोरण असल्याचही यावेळी रमेश यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS