शिवाजी महाराजांच्या किल्ल्ल्यांना हात लावणार नाही – जयकुमार रावल

शिवाजी महाराजांच्या किल्ल्ल्यांना हात लावणार नाही – जयकुमार रावल

पुणे – शिवाजी महाराजांच्या किल्ल्ल्यांना हात लावणार नाही. जे गट क मध्ये किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.विरोधी पक्षांकडे मुद्दे नसल्याने ते अफवा पसरवत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी कोणतीही माहिती घेतली नाही. ते कलाकार आहेत, त्यांना कोणत्या लग्नाला जायचंय?, मला माहीत नाही असा टोलारी रावल यांनी लगावला आहे. गड किल्ले लग्न समारंभांसाठी किंवा हॉटेल व्यवसायासाठी भाड्याने देण्याच्या निव्वळ अफवा असल्याचंही रावल यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते फडणवीस सरकारने केलं असल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे. शिवरायांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडत बलिदान केलं अशा २५ किल्ल्यांचे हॉटेल व डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा घाट घातलाय. हे संतापजनक व निषेधार्ह आहे. आम्ही कदापी हे होऊ देणार नाही असंही कोल्हे यांनी म्हटलं होतं त्यावर पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

COMMENTS