त्यांनीच मला निर्णय घ्यायला भाग पाडलं – हर्षवर्धन पाटील

त्यांनीच मला निर्णय घ्यायला भाग पाडलं – हर्षवर्धन पाटील

मुंबई – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल भाजपात प्रवेश केला. यानंतर त्यांनी आज काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांवर जोरदार टीका केली. मी पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना मला माझ्या तिकिटाचा पत्ता नव्हता. त्यामुळे भांबावून जायचो. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे नेतेही स्पष्ट भूमिका घेत नव्हते. सोनिया गांधीही लक्ष घालू इतकचं म्हणाल्या. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातली काँग्रेस कोण चालवतंय तेच कळत नाही,अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी काल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावर बोलत असताना त्यांनी अजित पवारांचं माझ्यावर फारच प्रेम आहे, अशी कोपरखळी लगावली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी मदत केली. त्यांना इंदापुरातून ७१ हजार लीड मिळाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते माझ्या घरी येऊन गेले आणि विधानसभेत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेस पक्षश्रेठींनाही याची कल्पना होती. परंतु नंतर काय झालं मला माहीत नाही. तसेच माझ्यावर होत असलेला अन्याय इंदापुरच्या जनतेला सहन झाला नाही. त्यांनीच मला निर्णय घ्यायला भाग पाडलं असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS