“त्यामुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या करण्यात आली !”

“त्यामुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या करण्यात आली !”

नवी दिल्ली – भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टनं केला आहे.दिल्लीतील २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता, परंतु आम्ही वेळीच दुर्घटना रोखली आणि आम आदमी पार्टीनं ७० पैकी ६७ जागा जिंकल्या अन्यथा भाजपानं निवडणुका जिंकल्या असत्या असं शुजानं म्हटलं आहे. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते असंही त्यानं म्हटलं आहे.दरम्यान शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा २००९ ते २०१४ या कालावधीत कर्मचारी होता असं त्यानं म्हटलं आहे. ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो असा शुजाचा दावा आहे. ही मशिन कशी हॅक करता येतील हे आपण दाखवू शकतो असंही त्यानं म्हटलं आहे. तसेच २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोपही त्यानं केला आहे.

COMMENTS