नव्या कायद्यामुळे बैलांचही पोषण शक्य नाही – राऊत

नव्या कायद्यामुळे बैलांचही पोषण शक्य नाही – राऊत

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ असलेल्या बैलांचंही पोषण करण्याची ताकद उरलेली नाही.” असं म्हणत  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बैलगाडीतून प्रवास करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

संजय राऊत म्हणाले, असं असलं तरीही फक्त मोदींच्या काळातच शेतकऱ्यांचा फायदा होऊ लागला असं म्हणता येणार नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्यापासून ते अगदी मनमोहन सिंग यांचं सरकार देशात असताना त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले. आपल्या देशाला कृषीप्रधान अशी ओळख मिळाली आहे कारण सुरुवातीपासूनच आपला देश शेतकऱ्यांना महत्त्व देत आला आहे. भाजपाकडून मात्र कडाक्याच्या थंडीत मागचे तीस दिवस आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं आहे ही बाब योग्य नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS