फडणवीसांच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतो आहे’ कार्यक्रमावर 4 कोटींची उधळपट्टी

फडणवीसांच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतो आहे’ कार्यक्रमावर 4 कोटींची उधळपट्टी

मुंबई – जय महाराष्ट्र, दिलखुलास आणि मी मुख्यमंत्री बोलतो आहे या कार्यक्रमावर वर्षाला 4 कोटी 45 लाख रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल टाकत मी मुख्यमंत्री बोलतो आहे, दिलखुलास आणि जय महाराष्ट्र हे कार्यक्रम सुरु केलेत.

जनतेशी संवाद साधणे, सरकारी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे या कार्यक्रमांची सुरु करण्यात आले. हे कार्यक्रम महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून 24 वेळा प्रसारित करण्यात येतील. हे कार्यक्रम सह्यादी वाहिनीवर एप्रिल महिन्यापासून सुरु झाले आहेत. 27 लाख 9 हजार 400 रुपये ऐवढा खर्च या कार्यक्रमाच्या एका भागासाठी होतो. यामध्ये शुटिंग करणे, चित्रीकरणाचे क्रोमा, मॉन्टेज म्युझिक, एडिटिंग, मेकअप मन, फ्लोअर मॅनेजर, पुन :प्रसारणाचा खर्च, वृत्तपत्रांमधील जाहिराती याचा समावेश आहे. या कार्यक्रमांसाठी वर्षाला 4 कोटी 45 लाख 12 हजार 800 रुपये एवढा खर्च होणार आहे. हा प्रस्ताव राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अर्थ विभागाकडे पाठवला होता. अर्थविभागाने याला मंजुरी दिली असून या खर्चाला 5 ऑक्टोबर रोजी मंजुरी दिल्याचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. राज्यावर तब्बल चार लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे त्यात शेतकरी कर्जमाफीमुळे तिजोरीवरील आणखीनच भार वाढला आहे.  अशा परिस्थिती या कार्यक्रमांसाठी एवढी पैशाची उधळपट्टी कशाला असा प्रश्न उपस्थित होतेय.

COMMENTS