अनिल गोटेंचं भाजपच्या सर्व आमदारांना पत्र, भाजप नेत्यांवर केले खळबळजनक आरोप !

अनिल गोटेंचं भाजपच्या सर्व आमदारांना पत्र, भाजप नेत्यांवर केले खळबळजनक आरोप !

मुंबई  भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या आमदारांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी पक्षातील नेत्यांवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपमध्ये छोटा राजन आणि दाऊदशी संबंधीत गुंडाना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. तसेच विधानपरिषद निवडणुकीत विनोद तावडे यांनी पैसे वाटले असून विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार पाडण्याचा डाव फसला असल्याचंही आमदार गोटे यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. गोटो यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान धुळ्यातल्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्याने अनिल गोटे आमदारकी आणि भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्याशी त्यांचा वादही झाला होता. त्यानंतर त्यांनी गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच गेली 30 वर्ष राजकारणात मला विरोध करणाऱ्या, दाऊद, छोटा राजन यांच्या सारख्यांना माझी सुपारी देणाऱ्या गुंडांना रावसाहेब दानंवे हे भाजपमध्ये मुक्त प्रवेश देत आहेत. या लोकांवर हत्या, अपहरण, खून, दरोडे यासारखे गुन्हे आहेत. भाजपचं अध:पतन अस्वस्थ करणारं आहे. मतं मिळविण्यासाठी आम्ही गुंडांना प्रवेश देतो असं दानवे सांगतात. अटलजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, उत्तमराव पाटील यांचा भाजप आज राहिला नसल्याचा आरोपही आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

COMMENTS