…त्यामुळे सुषमा स्वराज यांनी मैदान सोडले, पी. चिदंबरम यांचा गंभीर आरोप !

…त्यामुळे सुषमा स्वराज यांनी मैदान सोडले, पी. चिदंबरम यांचा गंभीर आरोप !

नवी दिल्ली – आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतला आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्वराज यांनी म्हटलं आहे. परंतु त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. सुषमा स्वराज या स्मार्ट असून मध्य प्रदेशात भाजपाची स्थिती खराब असल्याने त्यांनी मैदान सोडलं असल्याचं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान याबाबतचं ट्वीट चिदंबरम यांनी केलं असून या ट्वीटमध्ये त्यांनी सुषमा स्वराज यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच स्वराज यांच्या आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली आहे. श्रीमती सुषमा स्वराज यांनी देशाची विनम्रतेने सेवा केली आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना असल्याचं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS