काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाची चर्चा पुन्हा सुरु होणार, ‘त्या’ आठ जागांसंदर्भात सुरु आहे वाद !

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाची चर्चा पुन्हा सुरु होणार, ‘त्या’ आठ जागांसंदर्भात सुरु आहे वाद !

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील थांबलेली बोलणे उद्यापासून सुरू होत आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीतील निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेग देण्याचे ठरवले आहे. उद्या संध्याकाळी मुंबईत या दोन्ही पक्षांची बैठक होते आहे. दोन्ही पक्षांमध्ये राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांचे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित 8 जागांसंदर्भातील चर्चा उद्यापासून सुरू होणार आहे.

यातील काही जागांची अदलाबदल तर काही जागा मित्रपक्षांना सोडण्यासंदर्भात दोन्ही पक्षात चर्चा होईल. राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेश काँग्रेसने  जिंकल्यामुळे राज्यातील जागा वाटपामध्ये काँग्रेस आक्रमक राहण्याची शक्यता आहे. पुणे, नगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, औरंगाबाद, यवतमाळ, नाशिक जालना, नंदुरबार या आठ जागांसंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये अजूनही वाद सुरु आहे. त्यामुळे यामध्ये तोडगा काय काढला जातो याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS