अवघ्या काही तासात आटोपलं काँग्रेसचं उपोषण !

अवघ्या काही तासात आटोपलं काँग्रेसचं उपोषण !

मुंबई  अॅट्रसिटी कायद्यातील बदलांना विरोध आणि भारत बंदवेळी दलितांवर झालेल्या अत्याचारांविरोधात काँग्रेसनं आज देशभरात केलेलं उपोषण तीन ते चार तासात आटोपलं आहे. नवी दिल्लीत उपोषणाचा कार्यक्रम ३ तास उशिरानं म्हणजे १ वाजता सुरु झाला. कारण, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राजघाटावर नियोजित वेळेपेक्षा ३ तास उशिरानं पोहोचले. तर मुंबईतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी १० ऐवजी ११ वाजता उपोषणाला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची उपोषणाची लबाडीही उजेडात आली असून उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजन माकन आणि अन्य नेत्यांनी छोले-भटुऱ्यांवर ताव मारल्याचा दावा भाजपने केला आहे.

दरम्यान काँग्रेसनं केलेल्या या उपोषणाची देशभरात चर्चा सुरु आहे. कारण आजपर्यंत राजकीय नेत्यांनी अथवा समाज सेवकांनी दोन, आठ दिवस आणि आमरण उपोषण पुकारलं असल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु काँग्रेसनं केलेल्या तीन ते चार तासांच्या उपोषण होतं की थट्टा होती असा सवाल आता भाजप नेते विचारत आहेत.

 

COMMENTS