मुंबई मनपात काॅंग्रेसचा स्वबळाचा नारा

मुंबई मनपात काॅंग्रेसचा स्वबळाचा नारा

पुणे –  मुंबई महापालिकेत एक वेळ होती ज्यावेळी काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र मागील १० वर्षांमध्ये ही संख्या ३० ते ३५ वर आली आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदारभाई जगताप यांनी स्पष्ट केले. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाई जगताप यांनी चंपाषष्ठीनिमीत्त जेजुरी जि. पुणे येथील खंडेरायाचं दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.

जगताप म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्दतीने पार पाडणार असून महापालिका निवडणुकांसाठी मिलींद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम या सर्वांना सोबत घेऊन लढणार असल्याचंही जगताप यांनी स्पष्ट केलं.

COMMENTS