मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा पुढे ढकलली!

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा पुढे ढकलली!

नंदुरबार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऐवजी 22 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. 22 तारखेला धुळे शहरातून ही यात्रा सुरू होणार असून याआधी नंदुरबार जिल्ह्यातुन ही यात्रा सुरू होणार होती. तसेच शहादा येथे झालेल्या दुर्घटनेमुळे तेथील सभाही रद्द करण्यात आली असल्याची माहिती आहे.

दरम्यान कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांची राज्यातील महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. या पूरस्थितीमुळे स्थगित केलेल्या ‘महाजनादेश यात्रे’चा दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून सुरु होणार होता. परंतु ही यात्रा 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. नंदुरबार ते सोलापूर अशा ११ दिवसांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा प्रवास १४ जिल्ह्यांतील ५५ विधानसभा मतदारसंघातून होणार आहे. सुमारे १ हजार ८३९ किमी अंतराचा हा प्रवास असणार आहे.

COMMENTS