…तर मुख्यमंत्र्यांनाच अटक करा –संभाजी ब्रिगेड

…तर मुख्यमंत्र्यांनाच अटक करा –संभाजी ब्रिगेड

मुंबई – भिमा कोरेगावातील हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडेंना अटक करण्याच्या मागणीवरुन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत एल्गार रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संभाजी ब्रिगेडने समर्थन दिलं असून संभाजी भिडे यांना अटक होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. तसेच संभाजी भिडेंना अटक न करण्याच्या षडयंत्रामागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याच्या संशयाला वाव असल्याचंही कोकाटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नसून परीक्षा सुरु असल्याने रॅली काढू नका, वाहतुकीला अडथळा करु नका, असं आवाहन पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना केलं होतं. पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांनी रॅली काढली असून रॅलीला परवानगी नाकारुन सरकार लोकशाहीचा गळा दाबत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

 

COMMENTS