सर्व मागण्या मान्य होईपर्यंत शेतक-यांनी आंदोलन सुरूच ठेवावे – शरद पवार

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत शेतक-यांनी आंदोलन सुरूच ठेवावे – शरद पवार

मुंबई – संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत शेतक-यांनी एकजूट कायम ठेऊन आंदोलन सुरूच ठेवावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. अल्पकर्जधारकांचे कर्जमाफ करण्याचे संकेत देत सरकार शेतक-यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केलीय. दरम्यान शेतकरी संपावर जातो ही देशातील अभूतपूर्व आणि सराकरच्या दृष्टीने मोठी नामुष्कीची घटना असल्याचंही पवार म्हणाले. सरकारने तातडीने शेतक-यांची कर्जमाफी करावी अशी मागणीही पवार यांनी केलीय.

COMMENTS