शेतकऱ्यांना 10 हजार रुपये उचल देण्याची सरकारची योजना फसली – सचिन सावंत

शेतकऱ्यांना 10 हजार रुपये उचल देण्याची सरकारची योजना फसली – सचिन सावंत

कर्जबाजारी शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी 10 हजार रुपये उचल देण्याची राज्य सरकारची योजना फसली आहे. अशी टीका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

11 जून रोजी सरकारने याबाबतचा जीआर जारी केला होता. मात्र गेल्या साडे तीन महिन्यत राज्यातील 37 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी केवळ 24 हजार 131 शेतकऱ्यांना ही 10 हजार रुपये उचल मिळाली आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफी लागू होईपर्यंत शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी फायदा व्हावा म्हणून सरकारन 10 हजार रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला. तसे आदेशही बँकाना दिले. मात्र यातील अटींमुळे 37 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 43 हजार 18 शेतकऱ्यांनी ही 10 हजार रुपये उचल मिळावी म्हणून अर्ज केला. यातील 10 हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले. तर 24 हजार 131 शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांप्रमाणे 24 कोटी 8 लाख रुपये 14 ऑगस्टपर्यंत वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला नसल्याचे उघड होतंय. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याची टीका याप्रकरणी विरोधकांनी केली आहे.

COMMENTS