शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग देशाचे खरे हिरो – योगी आदित्यनाथ

शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग देशाचे खरे हिरो – योगी आदित्यनाथ

मुघल शासक बाबर आणि अकबर घुसखोर होते. त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. खरंतर महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग हे आपल्या देशाचे खरे हिरो आहेत. त्यांचा सन्मान झाला पाहिजे. असे यूपीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराणा प्रताप यांच्या जंयतीनिमित्त लखनऊमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधीत करताना म्हटले आहे.

 

यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणालेत,’ आपल्या इतिहासाचे संवर्धन करण्यास ज्या राज्याकडे, समाजाकडे वेळ नाही तो प्रदेश आपल्या भूगोलाचे संरक्षण करु शकत नाही. लोक जेव्हा ख-या इतिहासापासून प्रेरणा घेतील तेव्हा आपल्याला आयएसआय, इसिस किंवा अन्य अशा प्रकारच्या संघटनांपासून घाबरुन राहण्याची गरज उरणार नाही. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याचे राज्यपाल राम नाईक यांनी कौतुक केले.

COMMENTS