रावसाहेब दानवेंच्या घरा समोर शेतकऱ्यांच्या मुलांचे अन्नत्याग आंदोलन, राजीनाम्याची मागणी

रावसाहेब दानवेंच्या घरा समोर शेतकऱ्यांच्या मुलांचे अन्नत्याग आंदोलन, राजीनाम्याची मागणी

जालना – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील कार्यक्रमात शेतकऱ्यांविषयी असभ्य भाषा वापरून केलेल्या व्यक्तव्यावरून राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वक्‍तव्याचा तीव्र निषेध केला असून आज शेतकऱ्यांच्या मुलांनी दानवेंच्या घरा समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थाना बाहेर आज दि. 12मे रोजी पासून उस्मानाबाद, नाशिक, परभणी व औरंगाबाद येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी दानवेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते स्वतःला शेतकऱ्यांची मुले सांगत असून, दानवेंनी आमच्या बापाचा अपमान केला आहे, त्यामुळे दानवेंच्या  वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून,  जोपर्यंत दानवे राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असे आंदोलन कर्त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS