भूकंप देव करू शकतो, संजय राऊत नाही –  शायना एन.सी.

भूकंप देव करू शकतो, संजय राऊत नाही – शायना एन.सी.

भूकंप करणे संजय राऊत यांच्या हातात नसून देवाच्या हातात आहे, असे भाजप प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. जुलै महिन्यात भूकंप करणार असल्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिला होता, त्यावर शायना एन.सी. यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मागच्या तीन वर्षात महाराष्ट्रातले सरकार चांगले काम करत आहे. त्याचमुळे शिवसेनेकडून अशाप्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. अशी वक्तव्ये करून शिवसेनेला चर्चेत राहायचे आहे म्हणूनच संजय राऊत असली भाषा करत आहेत, असेही शायना एनसी पुण्यात म्हटल्या आहेत.

शायना यांनी सरकार शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक असून त्या दृष्टीने दीर्घकालीन आणि अल्पकालीन उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली असून बाहेरील देशातही याची दखल घेतली गेल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सरकारच्या तीन वर्षाच्या कालावधीतील विविध विकासकामांची माहिती त्यांनी दिली. सरकारने महिलांसाठी राबवलेल्या प्रधान मंत्री उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना यासोबत विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या प्रधानमंत्री कौशल योजना, मुद्रा बँक अकाउंट योजना यासारख्या योजनाद्वारे महिला सक्षमीकरणास मोठा हातभार लागल्याचे त्यांनी सांगितले. गावपातळीवर सुद्धा नव-या मुलाच्या घरात शौचालय असल्याशिवाय मुलगी लग्नाला तयार होत नाही. त्यामुळे स्वच्छता ही आता महत्वाची गरज झाली असून ही भाजप सरकारने देशाला दिलेली देणगी असल्याचे सांगत सरकारच्या स्वच्छता अभियानाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.

COMMENTS