भाजप घोषणाबाज सरकार आहे – राधाकृष्ण विखे-पाटील

भाजप घोषणाबाज सरकार आहे – राधाकृष्ण विखे-पाटील

‘भाजप सरकार घोषणाबाज सरकार आहे. कुठलेही नवीन विधायक किंवा विकासाचे व्हिजन न घेता आघाडी सरकारने राबविलेल्या जुन्या योजनांचीच नावे बदलून ती राबविली जात आहेत. गेल्या तीन वर्षात नाव घेण्यासारखा एकही प्रकल्प राज्यात येऊ शकला नाही. तीन वर्षात सरकारने केवळ घोषणा केल्या, कामांची बोंबाबोंब आहे. हे अपयश झाकण्यासाठी राज्यात सामाजिक दुही निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधा:यांकडून सुरू आहे.’ असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी रविवारी नंदुरबारात केला.

नंदुरबार पालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत विखेपाटील बोलत होते. 34 हजार कोटी रुपयांची शेतक:यांची कजर्माफी जाहीर केली, परंतु त्यासाठी जाचक अटी लादल्याने शेतक:यांना अद्यापही त्याचा लाभ मिळू शकत नाही. सर्वच विभागात अनागोंदी सुरू आहे. त्यामुळे सरकारचे हे अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधारी सामाजिक दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही राधाकृष्ण विखेपाटील यांनी यावेळी केला.

COMMENTS