नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने खोलले खाते !

नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने खोलले खाते !

सिंधुदूर्ग – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने खाते खोलले आहे. सावंतवाडी तालुक्यात पाच ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच करत जिल्ह्यामध्ये खाते उघडले आहे. रविवारी राणेंनी नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर आज हा विजय म्हणजे स्वाभिमान पक्षाच्या राजकीय घोडदौडीचा चांगला श्रीगणेशा आहे.

नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केल्यानंतर  त्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘समर्थ विकास पॅनल’च्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात पाच ग्रामपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने खाते उघडले आहे. तालुक्यातील 52 पैकी 50 ग्रामपंचायतीत समर्थ विकास पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे केले होते. त्यातील नेतर्डे, कवठणी, तळवणे, कलंबिस्त, वेर्ले आदी पाच ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवडले गेले आहेत.

 

COMMENTS