यशोमती ठाकूरांचा शरद पवारांना इशारा

यशोमती ठाकूरांचा शरद पवारांना इशारा

मुंबई – शरद पवार यांनी दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टिका केली होती. यावर महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त करत शरद पवार यांचे नाव न घेता काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. असा सूचक इशारा दिला.

मुलाखतीमध्ये शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता की, सध्या देश राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारण्यास तयार आहे का ?’ या प्रश्नावर पवार म्हणाले की, ‘याबाबत अनेक तर्क-वितर्क आहेत. सध्या त्यांच्यात(राहुल गांधी) सातत्याची कमतरता आहे.’ सध्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. या पवारांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहे. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. “आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे,” असं म्हणत ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

 

 

COMMENTS