भाजपचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

भाजपचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

पालघर : माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं जात होतं. त्यात आज मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या सावरा यांचे पालघर भागात कार्यक्षेत्र होते. १९८० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते भाजपमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून रुजू झाले. 1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने वाडा मतदार संघात उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यात त्यांना यश मिळाले नाही. 1985 पुन्हा वाडा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवली. यातच त्यांचा पराभव झाला. मात्र तरीही त्यांचे सामाजिक काम सुरूच होते. आदिवासी समाजासाठी त्यातही तरुणांसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. आदिवासाची समाजाच्या उन्नतीसाठी ते कायम पुढाकार घेत होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख आहे. २०१४ मध्ये दुसऱ्यांदा त्यांना आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

 

COMMENTS