प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, एमआयएमकडून मोठी घोषणा !

प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, एमआयएमकडून मोठी घोषणा !

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसला असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये आगामी विधानसभा निवडणूक  स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये फूट पडली आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे एमआयएममध्ये नाराजी आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत जलील यांनी व्यक्त केली आहे. दलित-मुस्लीम ऐक्य घडल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात असे सांगत लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी हे एकत्रित आले होते. त्यांच्या या एकीमुळे अनेक पक्षांना धक्का बसला होता. विधानसभा निवडणुकीतही राज्यातील मोठ्या पक्षांना धक्का बसेल असं बोललं जात होतं. परंतु आता एमआयएमने घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रकाश आंबेडकर यांना धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS