“…तर लालू प्रसाद यादव आज राजा हरिश्चंद्र असते”

“…तर लालू प्रसाद यादव आज राजा हरिश्चंद्र असते”

बिहार – लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवल्यामुळे भाजपवर आरजेडीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. लालू प्रसाद यादव यांचे पूत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीका केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी भाजपला साथ दिली असती तर आज ते भाजपसाठी राजा हरिश्चंद्र असते, असं तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

दरम्यान लालू प्रसाद यादव हे तुरुंगात गेल्याने त्यांचे राजकीय आयुष्य संपले असे विरोधकांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे असंही ते म्हणाले आहेत. लालूप्रसाद तुरुंगात गेल्याने बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला फटका बसेल, अशी चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षात फूट पडेल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. त्यामुळे लालू तुरुंगात असताना पक्ष सांभाळण्याचे आव्हान लालूंच्या मुलांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

 

COMMENTS