…तर आमदारकीचा राजीनामा देऊन मी शिपाई म्हणून काम करेन – तानाजी सावंत

…तर आमदारकीचा राजीनामा देऊन मी शिपाई म्हणून काम करेन – तानाजी सावंत

मुंबई – मराठवाड्यातील पाणी प्रश्नाबाबत माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंतांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.पाण्याच्या बाबतीत त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मराठवाडा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. गेली 50 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला. आमच्या युती सरकारने जी वॉटरग्रीड सिस्टम मंजूर केली होती, त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याने स्थगिती देण्याचं कारस्थान केलं, असा आरोप तानाजी सावंत यांनी केला.

दरम्यान शिवसेना पक्षाने माझ्या आमदारकीचा, पदाचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन, पण पद सोडताना माझी एकच अट असेल, माझ्या भागाला 21 टीएमसी पाणी द्या, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. पाण्याच्या बाबतीत माझ्या जिल्ह्यावर अन्याय केला, तर तो हाणून पाडेन. मग कुठला पक्ष याचा मुलाहिजा बाळगणार नाही, असा इशाराही तानाजी सावंत यांनी दिला. कुठल्या पक्षाची मराठवाड्याप्रती काय भूमिका आहे, हे दोन-चार महिन्यात स्पष्ट होईल, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

जो या जिल्ह्याच्या विरोधात तो आपला विरोधक आहे. मंत्रिपदाचं कवच गेलं, पण आमदार तोच आहे. आपल्याला मंत्रिपद दिलं नाही, त्यामुळे विकास होईल का, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. पण विकासाच्या आड कोणी आलं, तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी तानाजी सावंत मागे वळून पाहणार नाही, असंही ते म्हणाले. तसेचमहिना-दोन महिने तुमच्या हाती अधिकार आले, म्हणून हुरळून जाऊ नका. कधी पहाटे पाच वाजता अधिकार निघून जाईल, सांगता येणार नाही, असा टोलाही सावंतांनी लगावला आहे.

COMMENTS