राष्ट्रवादी सोडून गेले त्यांना शुभेच्छा, पण…सुप्रिया सुळेंचा इशारा !

राष्ट्रवादी सोडून गेले त्यांना शुभेच्छा, पण…सुप्रिया सुळेंचा इशारा !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडून जाणाय्रा या नेत्यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला आहे.
पक्ष सोडून गेले त्यांना शुभेच्छा,पण नंतर पुन्हा पक्षात येणार असतील तर त्यांना लाईनमध्ये उभे राहावे लागेल असा इशारा सुळे यांनी दिला आहे.

दरम्यान सध्या राजकारण ढवळून निघतय, ईडी सीबीआय, बँक कर्जे यासारख्या अनेक जण पक्षांतर होतंय, आमिषे दिली जातायत, येणाय्रा सत्तेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेतेच कॅबिनेट असणार असे दिसतंय. सगळ्यांना पदे देणार म्हणतायत कोणाला युती पदे देणार ? संघर्ष असतोच ,नुकसान होत असले तरी हेडलाईनला आम्हीच आहोत असंही सुळे यांनी म्हटलं आहे. ईडी सीबीआय संस्कृती येतेय, दुष्काळाची चिंता सरकारला नाही. राज ठाकरे यांची निवडणुकीपूर्वी केस बाहेर कशी आली, राजकारणातही सुसंस्कृतपणा संपत चालला असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

COMMENTS