1977 सारखी पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही – शरद पवार

1977 सारखी पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही – शरद पवार

मुंबई – सध्या 1977 सारखीच परिस्थिती झाली असून सध्याचे सरकारही एकखांबी नेतृत्व चालवत असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. 1977 मध्ये ज्याप्रमाणे विरोधकांनी एकजूट होऊन सत्ताधाऱ्यांना सरकारला खाली खेचले होते तसेच आताही सर्व विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली असून 1977 सारखी पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या भाजपाने विरोधाकांना मान दिला पाहिजे आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये विराधकांना मानाचे स्थान देण्याबाबतचही मत पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच शेतक-यांबाबत सरकारची नियत चांगली नसल्यामुळे शेतक-यांनी त्यांचे प्रश्न सुटेपर्यंत टोकाची भूमिका घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.

दरम्यान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर 1977 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी विरोधकांनी इंदिरा गांधीचे सरकार कोसळवले होते. तिच परिस्थिती सध्या आली असल्याचं दिसत असून सर्व विरोधकांनी एकवटण्यास सुरुवात केली असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांत दहा पैकी 9 जागी भाजपा पराभूत झाली. त्यामुळे बदलत चाललेले जनमत लक्षात घेऊन आता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे, आणि ही विरोधकांसाठी मोठी गोष्ट असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS