शेतकरी आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा, आंदोलन तीव्र होण्याची शक्यता !

शेतकरी आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा, आंदोलन तीव्र होण्याची शक्यता !

मुंबई –  देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मी शेतकरी आहे, शेतकरी म्हणून या आंदोलनाला माझी साथ असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच समाजातील इतर घटकांनीही आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं रहावं असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. हा संघर्ष आता प्रश्न सुटेपर्यंत थांबवायचा नाही, राज्य आणि केंद्र सरकारने त्यांचा शब्द पाळला नसून शब्द पाळण्याची त्यांची नियतही दिसत नसल्याची जोरदार टीका शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी असंही पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी रस्त्यावर दुध ओतणे, भाजीपाला रस्त्यावर फेकणे हे प्रकार टाळता आले तर टाळावेत. तसेच गरीब वर्गात हा माल वाटावा, याने तुम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही आणि सरकारला तुमचा आक्रोश या माध्यमातून दिसेल व गरीबांची सहानुभूती मिळेल असंही पवार यांनी म्हटलं आहे.  तसेच उत्पादन खर्चावर ५० % नफा हा शेती मालाच्या किंमतीचा आधार धरला जाईल आणि त्यापद्धतीने पाऊले टाकले जातील, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी चार वर्षांपूर्वी निवडणूक प्रचारात दिलं होतं. परंतु या गोष्टीची अंमलबजावणी गेल्या चार वर्षात झाली नाही. तसेच सरकारने याची अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी पहिल्यांदाच करत नाही तर गेल्या दोन-तीन वर्षात कधी दिल्लीत, कधी दक्षिण भारतात, कधी उत्तर प्रदेशात तर कधी मध्य प्रदेशात तर कधी आपल्या महाराष्ट्रात सातत्याने रस्त्यावर येत आहेत आणि आपली भूमिका मांडत आहेत. तसेच माझी देशवासीयांना विनंती आहे की बळीराजा काही सुखासुखी रस्त्यावर येत नाही.

त्याला अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्याला व्यवसाय करणं अशक्य झालं असून तो कर्जबाजारी झाला आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचंही शरद पवार यीं म्हटलं आहे. त्यामुळे बळीराजा टोकाची भूमिका घेत असून या आंदोलनात सामान्य माणसाला त्रास होईल असं कोणतंही काम शेतकऱ्यांनी करू नये असं आवाहनही यावेळी पवार यांनी केलं आहे.

COMMENTS