कृषी विधेयकाबाबत शरद पवार द्विधा मनस्थितीत – फडणवीस

कृषी विधेयकाबाबत शरद पवार द्विधा मनस्थितीत – फडणवीस

रायगड: ‘युपीए सरकारच्या काळात शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारावरच आताच्या केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे केलेले आहेत. त्यामुळेच शरद पवार हे आज द्विधा मनस्थितीत आहेत. कायद्यांचे समर्थन करावे की त्याला विरोध करावा, असा प्रश्न पवारांना पडला आहे’, असे विधान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका केली. ते रायगड येथे पत्रकारांशी बोलताना केले.

फडणवीस म्हणाले, पवार यांना केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या मूळ तत्वांना विरोध केलेला नाही. ते त्यावर बोलतच नाहीत, असे नमूद करतानाच काही जण वाहत्या गंगेत हात धूत आहेत, असा मोघम टोलाही फडणवीस यांनी लगावला. उत्तरेतील पंजाब आणि हरयाणा वगळता अन्य कोणत्याही राज्यात या कायद्यांविरुद्ध आंदोलन झालेले नाही. महाराष्ट्रात काँग्रेसने आंदोलन केले मात्र त्यात नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. काँग्रेसच्या या आंदोलनाला शेतकऱ्यांचा अजिबात प्रतिसाद नव्हता, असेही फडणवीस म्हणाले. खरंतर विरोधकांनी हे कृषी कायदे समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यांना तसे करायचे नाही. त्यातून काही जण झोपेचे सोंग घेऊन शेतकरी हिताच्या कायद्यांना विरोध करत आहेत. स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला. कृषी कायद्यांच्या अध्यादेशांवर अंमलबजावणी संबंधी आदेश काढणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असेही फडणवीस म्हणाले.

 

COMMENTS