सांगलीतील चार ते पाच बडे नेते भाजपात प्रवेश करणार ?

सांगलीतील चार ते पाच बडे नेते भाजपात प्रवेश करणार ?

सांगली – जिल्ह्यातील चार ते पाच बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचं 29 ऑगस्ट रोजी सांगलीत आगमन होणार आहे. या दिवशी हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे. परंतु या नेत्यांचं नाव त्यांनी सांगितलं नसून 29 ऑगस्ट रोजीच जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होईल असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या नियोजनासाठी शनिवारी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगलीत बैठक घेतली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 29 ऑगस्टरोजी सकाळी 10 वाजता सांगली जिल्ह्यात येणार आहे. कासेगाव (ता. वाळवा) येथे यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS